'टाइम मॅनेजमेंट' या पुस्तकाला मिळालेला 'राजभाषा पुरस्कार' सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटीलयांच्याकडून स्वीकारताना लेखिका डॉ. रेखा व्यास जीवनात चार प्रकारचे काम केले जाते, - अत्यावश्यक आणि महत्त्वाचे - अत्यावश्यक पण महत्त्वाचे नसलेले - अत्यावश्यक नसलेले तरीही महत्त्वाचे - अत्यावश्यक आणि महत्त्वाचे नसलेले आपल्या कामाची विभागणी करून त्याचे वेळ व्यवस्थापन केले तर प्रत्येक काम वेळेवर केले जाऊ शकते. गेलेली वेळ कधीही परत येत नाही. वेळ खूप सामर्थ्यशाली असतो. जे लोक वेळेची पर्वा करीत नाहीत, वेळ त्यांची पर्वा करीत नाही. अशा प्रकारच्या अनेक म्हणी वाक्प्रचार आपल्याला माहीत असूनही आपण वेळ वाया घालवित असतो आणि काही काळानंतर मग वेळ आपल्याला वाया घालवितो. वेळेची कात्री आपल्या जीवनावर चालावी असे तुम्हाला वाटत नसेल, तर रेखा व्यास यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचा.