Kirjailija
Vijay Tendulkar
Kirjat ja teokset yhdessä paikassa: 26 kirjaa, julkaisuja vuosilta 1900-2023, suosituimpien joukossa Tyachi Pachavi. Vertaile teosten hintoja ja tarkista saatavuus suomalaisista kirjakaupoista.
26 kirjaa
Kirjojen julkaisuhaarukka 1900-2023.
विजय तेंडुलकर यांच्या नाट्यप्रवासातील एक विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या आशयांबरोबर त्यांना योग्य अशा आविष्कारपद्धतींचा अवलंब केला किंवा त्या नव्याने निर्माण केल्या. सुरुवातीच्या 'श्रीमंत', 'माणूस नावाचे बेट' सारख्या नाटकांत त्यांनी पारंपरिक सामाजिक नाटकाचा ढाचा वापरला तर 'सरी ग सरी', 'घाशीराम कोतवाल', 'गिधाडे' किंवा 'विठ्ठला' या नाटकांत आशयभिन्नतेनुसार वेगवेगळ्या आविष्कारपद्धती स्वीकारल्या. 'सफर' या नाटकातला अनुभव अनेकपदरी आहे. आपण ज्या 'मूड'मध्ये हे नाटक वाचू, ऐकू किंवा पाहू त्यानुसार याची वेगवेगळी रूपे दिसू लागतील. वरवर पाहता ही एका काहीशा मतिमंद वाटणाऱ्या माणसाची काल्पनिक सायकल सफर आहे. या नाटकाकडे निखळ गंमत म्हणूनही पाहता येईल किंवा यातल्या घटनांमध्ये लपलेले अर्थही शोधता येतील, ही नुसती गंमत मानली तरी ती जाता जाता सबंध आयुष्याला गवसणी घालणारी. विजय तेंडुलकर यांच्या ध्वनिफितीवरील वाचनात यातील बारकावे अधिक स्पष्ट होतात. या ' अनुभव नाटकाची' ही संहिता.
केवळ गंभीर प्रवृत्तीचीच नाटके विजय तेंडुलकरांनी लिहिलेली नाहीत तर सुखात्मिका आणि तिची वेगवेगळी रूपे म्हणता येतील अशी नाटकेही त्यांनी लिहिलेली आहेत. गंभीर प्रवृत्तीच्या नाटकांइतकीच ही नाटके आशयघन आहेत. हलकीफुलकी असली तरी ही नाटके उथळ नाहीत; संयम आणि सहजतेच्या सीमारेषा यांत पाळलेल्या आहेत. 'विठ्ठला' हे नाटक अशाच प्रकारच्या विनोदी माध्यमातून जाणारे हलकेफुलके नाटक विनोदी, चटकदार संवाद आणि काल्पनिकता यांमुळे हे नाटक तेंडुलकरांच्या इतर नाटकांहून खूप वेगळे आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात समाजात ढासळत चाललेली मूल्यव्यवस्था आणि त्याचा विरोध करत नैतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पदरी पडणारी निराशा 'एक हट्टी मुलगी' या नाटकाद्वारे विजय तेंडुलकरांनी व्यक्त केली आहे. या नाटकातील जीवनपट आणि व्यक्तिरेखा कनिष्ठ मानलेल्या मध्यमवर्गातील आहेत. संवाद आणि रंगमंचीय सूचना यांतून या नाटकातील आशयाचे अनेक स्तर उलगडताना दिसतील.
के. के. बिर्ला फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा अखिल भारतीय पातळीवरचा 'सरस्वती सन्मान' या नाटकाच्या निमित्ताने प्रथमच एका मराठी नाटककाराला मिळाला. हा सर्वोच्च सन्मान विजय तेंडुलकरांना मिळावा याविषयी कोणाचेही दुमत नव्हते; परंतु तो त्यांच्या 'कन्यादान' या नाटकाला मिळावा याचे काहीसे आश्चर्य अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. तेंडुलकरांच्या ज्या नाटकांना अमाप प्रसिद्धी मिळाली ('शांतता कोर्ट चालू आहे'), ज्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले ('घाशीराम कोतवाल') किंवा ज्यांमुळे तेंडुलकर वादाच्या भोवऱ्यात सापडले ('गिधाडे', 'सखाराम बाइंडर') अशा नाटकांपुढे 'कन्यादान'चे कौतुक झाले नव्हते किंवा त्या नाटकाचे मोठेपण जाणवले नव्हते. 'कन्यादान' या नावापासूनच कौटुंबिक जिव्हाळ्याचे असावे असा आभास निर्माण करणारे हे नाटक आशयाची मोठी उंची गाठते. आज अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या विषयासंबंधीची एक प्रगल्भ समाजशास्त्रीय जाण या नाटकातून व्यक्त होते. दलित विचारधारणा, समाजवादी विचारधारणा, स्त्री-पुरुष संबंध यासंबंधीचे फार वेगळ्या पातळीवरचे विचार या नाटकाच्या गाभ्याशी आहेत. याविषयीची एक कार्यकर्ते म्हणून असलेली विजय तेंडुलकरांची मते सर्वज्ञात आहेत. आणि तरीही हे नाटक कुठेही प्रचारकी होताना मात्र दिसत नाही. कारण नाटकातील प्रत्येक पात्राचे मानसशास्त्रीय आकलन लेखकाला आहे. नाथ देवळालीकर, सेवा, ज्योती, अरुण, एवढेच नव्हे तर संपूर्ण नाटकात जवळ जवळ नगण्य ठरलेला जयप्रकाश यांचे परस्परांतले संबंध स्वाभाविक वाटतात. त्यांच्या विचार करण्याच्या वागण्याच्या पद्धतीत लेखकाचा विचार डोकावत नाही. हेच या नाटकाचे फार मोठे यश आहे.